Sunday, May 28, 2023

बारा वर्षांची अवनी करते 'पपेट शो'


अवघ्या १२ वर्षांच्या अवनी भंडारी हिने 'पपेट-शो' अर्थात बाहुली नाट्य या कलाप्रकांरात प्रावीण्य मिळवले असून, ती चक्क व्यावसायिक प्रयोग करत आहे. तिची आई, चैताली माजगावकर-भंडारी या प्रसिद्ध पपेट आर्टिस्ट आहेत. त्यांचा वारसा अवनी लहान वयापासूनच चालवत आहे. अवनी लहान असताना विंगेत बसून आईला सादरीकरण करताना पाहत असे. त्यातून तिलाही या कलेची आवड निर्माण झाली. मग घरगुती कार्यक्रमांमध्ये तिने आपले प्रयोग सुरू केले. हळूहळू जम बसत गेल्यावर आता व्यावसायिक पद्धतीने अवनी सादरीकरण करू शकते. वयाच्या सातव्या वर्षांपासून ती आईसह 'पपेट शो' करते आहे. आता ती बारा वर्षांची असून, तिने आजवर जवळपास ७५ प्रयोग केले आहेत. सध्या ती प्रभात रस्त्यावरील सिंबायोसिस शाळेत सहाव्या इयत्तेत शिकते आहे. 

हँड पपेट, ग्लो पपेट, स्टीक पपेट या बाहुल्या अवनी लीलया पद्धतीने नाचवते. शब्दभ्रम ही कला तर तिने अगदी लहानपणापासून अवगत केली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत, तर अवनी तिच्या आईसोबत सततच्या प्रयोगांमध्ये व्यग्न आहे. तिचा जुळा भाऊ, अर्णव : भंडारी हा पपेट विक्रीचा स्टॉल एकहाती सांभाळतो. 'पपेट शो' कला काळच्या पडद्याआड जाण्याची परिस्थिती असताना, ती जिवंत ठेवण्यासाठी या माय लेकी प्रयत्न करत आहेत.  स्वतः चैताली माजगावकर-भंडारी या गेली अनेक वर्षे सातत्याने 'पपेट  शो' करत आहेत. त्यांचे वडील सुरेंद्र माजगावकरदेखील हे प्रयोग  करत असत. आता ही तिसरी पिढी, अवनी आणि अर्णव ही दोन्ही  मुले आपापल्या परीने ही कला जतन करण्याचे आणि तिचा प्रसार  करण्याचे प्रयत्न करत आहेत. 

बाहुलीनाट्य म्हणजे काय? 

 पपेट हा अर्थात बाहुलीनाट्य या कलेचा उगम अनेक  शतकांपूर्वी झाला असावा. मनोरंजनाची साधने कमी असताना  बाहुल्यांचे खेळ होत. कठपुतली, बोलक्या बाहुल्या, सावलीच्या  बाहुल्या, हातातल्या बाहुल्या, काठीवरच्या बाहुल्या असे अनेक  प्रकार या कलेत येतात. समोरची बाहुली पूर्णतः निर्जीव आहे, याची प्रेक्षकांना कल्पना असतानाही आपल्या आवाजाच्या कौशल्याने आणि उत्तम हस्त नियंत्रणातून हातातील बाहुलीला  जिवंत करणारी शक्ती म्हणजे शब्दभ्रमकार (पपेट आर्टिस्ट)






बायकोची अडचण बघून त्याने 200% डोकं लावलं आणि बनवला 1बाय 15 सोलर मिक्सी


 यावर रेडिओपासून फॅनपर्यंत सर्वकाही चालतं

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात.  हीच गरज माणसाला त्याच्या मध्ये दडलेल्या प्रतिभेची ओळख करून देते. या गरजेमुळेच बिजू नारायणन यांना आपण काय करू शकतो याची जाणीव झाली.लहानपणापासूनच या गरजा त्याच्यासमोर येत राहिल्या आणि बिजू आपले अप्रतिम कौशल्य दाखवत राहिले. 

वयाच्या १२व्या वर्षी बनवला रेडिओ 

 12 वर्षांचं वय होतं, बिजूला संगीत ऐकण्याची आवड होती पण खिशात रेडिओ घेण्याइतके पैसेही नव्हते. मग काय, या कोवळ्या वयात त्याने स्वतः रेडिओ बनवला. ही त्याच्या अतिशय जिज्ञासू डोक्याची कमाल होती.हे कुतूहल शांत करण्यासाठी तो पुस्तकांतून प्रत्येक गोष्टीचे उत्तर शोधून काढी आणि  नंतर त्याचा उपयोग करी. हा सराव चालू राहिला आणि त्याला अनेक वेळा यशही मिळाले. यावेळी गरज त्यांच्या पत्नीची होती आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी बिजू यांनी मन लावून अशी तयारी केली जी एक इतरांसाठी उदाहरण ठरली. 

पत्नीला अस्वस्थ पाहून बनवले महामिक्सर 

खरेतर, बिजूने आपल्या पत्नीचा त्रास पाहून 15 इन 1 स्मार्ट सोलर मिक्सी तयार केली जी विजेशिवाय चालते. ही महामिक्सी सामान्य मिक्सीपेक्षा खूप वेगळी आहे. सुमारे 15 अद्वितीय वैशिष्ट्यांसह या मिक्सीमध्ये भाज्या कापण्यापासून ते व्हॅक्यूम क्लिनर, रेडिओ आणि स्मोक डिटेक्टरपर्यंत वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्ट्ये जोडून ही महामिक्सी बनवण्यासाठी बिजूला 10 वर्षे लागली.या नवोपक्रमासाठी बिजूला पुरस्कारही मिळाला आहे. 

पूर्ण तयारीसाठी  लागली 10 वर्षे 

केरळचे रहिवासी बिजू नारायण केरळ यांनी एक स्मार्ट सोलर मिक्सी बनवली आहे. यात मिक्सर आणखी 15 वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्ट सोलर मिक्सीचा शोध बिजूने 2010 मध्ये लावला होता. बिजू अनेकदा पाहत असे की जेव्हा वीजपुरवठा खंडित होतो तेव्हा त्यांच्या पत्नीला काम करताना खूप त्रास होतो. त्यानंतर बिजूने आपल्या डोक्याचा वापर करून ही अप्रतिम मिक्सी तयार केली. 

15 अद्वितीय वैशिष्ट्यांसह हे मिश्रण भाज्या चॉप करते.  यासोबतच यामध्ये वाय-फाय मॉडेम आणि स्मोक डिटेक्टरही बसवण्यात आले आहेत. रेडिओसह या मिक्सीमध्ये मोबाईल फोन चार्ज करण्याचीही सुविधा आहे. शिवाय व्हॅक्यूम क्लिनरचे कामही करून घेता येते.  तसेच, मिक्सीमध्ये 3 डब्ल्यू इमर्जन्सी लाईट  आणि एक पंखा आहे.

सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह हे मिश्रण तयार करण्यासाठी एक दशक लागले. ही रिमोट-ऑपरेटेड मिक्सी 20 डब्ल्यू सोलर पॅनेल किंवा डायरेक्ट करंटने चार्ज होते.पूर्ण चार्ज केल्यानंतर ते 8 तास टिकते.  या शोधासाठी 53 वर्षीय बिजू यांना केरळ सरकारने ग्रामीण नवोन्मेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. बिजू आता ही स्मार्ट मिक्सी व्यावसायिक स्तरावर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.


Tuesday, May 23, 2023

महाराष्ट्रात प्रथमच हवेतील आर्द्रतेचा वापर करून होणार पाण्याची निर्मिती


पाण्याअभावी प्रसंगी गावेच्या गावे स्थलांतरित होतात. मुक्या जनावरांची तडफड होते. शहरात निदान टँकरने तरी पाणीपुरवठा होतो; पण दुर्गम भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. ४०० ते ५०० फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील राणीगाव हे समुद्रसपाटीपासून ३७७८ मीटर सर्वाधिक उंचीवरील गावही याला अपवाद नव्हते. परंतु, येथील पिण्याच्या पाण्याची गरज आता हवेतील आर्द्रतेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. नागपुरातील साम्विद इंटरनॅशनल या संस्थेने नटराज निकेतन या संस्थेच्या मदतीने राणीगाव येथे हवेतील आर्द्रतेचा वापर करून शुद्ध पाण्याच्या निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प उभारला आहे. मे महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पाचे लोकार्पण होईल, अशी माहिती साम्विद इंटरनॅशनलचे महाव्यवस्थापक मुकुंद विलास पात्रीकर यांनी दिली.

२,१८७ लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांना पाण्यासाठी ५ ते १० किलोमीटर पायपीट नेहमीचीच होती. गावात नोव्हेंबरपासूनच सुरू होणारी पाणीटंचाई ग्रामस्थांना जाणवते. परंतु, आता किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मार्गी लागत आहे. तोही पाइपलाइन किंवा बोअरने नव्हे, तर हवेच्या माध्यमातून.

सध्या रणरणता उन्हाळा सुरू आहे. पाण्याचा थेंबही मोलाचा ठरत आहे. यातच हवेतील बाष्पाचा वापर करून पाण्याची निर्मिती करता आली तर किमान पिण्यासाठी पाण्याची सोय तरी होईल या विचारांतून हे तंत्र विकसित करत पात्रीकर यांनी हे संयंत्र राणीगाव येथे उभारले. “साम्विद आॅक्सिऔरा अॅटमाॅसस्पेरिक वाॅटर जनरेटर’ हे या मशीनचे नाव आहे.

उपकरणात एअर फिल्टरमधून हवा शोषून घेतली जाते. हवेतील धूलिकण व प्रदूषित घटक फिल्टरद्वारे काढले जातात. नंतर दवबिंदूंचे तापमान कमी केले जाते व हीट एक्स्चेंजरवर पिण्याचे पाणी तयार होते. ते एकत्रित करून एका टाकीत साठवले जाते. या पाणीनिर्मितीसाठी ७.२ किलोवाॅट (सिंगल फेज) वीज लागते. तापमान १२ ते ४८ डिग्री सेल्सियस आणि आर्द्रता ३० ते ९९ टक्के हवी. मात्र साम्विद इंटरनॅशनलने विकसित केलेल्या यंत्रात यापेक्षा कमी आर्द्रतेतही पाणीनिर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. मुकुंद पात्रीकर यांच्यासह निखिल व्यास, मधुरा व्यास आदी तांत्रिक चमूने प्रत्यक्ष गावात जाऊन, संपूर्ण बाजू तपासून प्रकल्पाचा आराखडा तयार करून उभारणी केली आहे.

हवेतील दवबिंदूंचे तापमान कमी करून होते पाण्यात रूपांतर, नंतर टाकीत साठवले जाते. ग्रामपंचायतीचा एक कामगार एका कुटुंबासाठी रोज दहा ते बारा लिटर पाणी वितरणाचे नियोजन करणार: ४०० फूट खोलीवरही या भागात पाणी लागत नाही.,१० ते ५० टक्के आर्द्रतेवर काम करते हे संयंत्र, ५०० ते १ हजार लिटर पाणी रोज मिळू शकेल"

 

आशिया खंडातले पाहिले पुस्तकांचे गाव- भिलार


महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट नुकतीच भेट दिली. या गावातल्या कुटुंबांनी आपल्या राहत्या घरातील जागा पुस्तकालयासाठी दिली आहे. हे गाव देशासाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले. चला तर मग जाणून घेऊया भिलार या पुस्तकाच्या गावाविषयी!

पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी आणि सध्या त्याचबरोबर पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे भिलार गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून आठ कि.मी. आंतरावर आहे. या छोट्याशा पण टुमदार गावाने भारतातील पहिले “पुस्तकांचे गाव” होण्याचा मान पटकावला आहे. पुस्तके आणि साहित्यासंदर्भातील ओळख असल्यामुळे याबरोबरच येणारा सुसंस्कृतपणा गावात फिरताना पदोपदी जाणवतो. 

गावातील काही घरांनी (प्रथम २५ घरे होती, आता ३० झाली आहेत.) आपल्या घरातीलच एका खोलीचे ग्रंथालय बनवले आहे. अतिशय नेटकेपणे ठेवलेली एकेका विषयावरील पुस्तके, तिथेच बसून वाचनाची उत्तम सोय, वाचनासाठी आवश्यक असे वातावरण, घरातील व्यक्तींचे प्रसन्न, अगत्यपूर्ण सहकार्य या गोष्टी अनुभवून रसिक वाचकाचे मन प्रसन्न होते. आपण स्वतः पुस्तकांच्या कपाटांमधून, रॕक्सवरून पुस्तके घेऊन हाताळू शकतो.  हे सर्व संपूर्णपणे निःशुल्क आहे. प्रत्येक पुस्तकालयात सुबक अशी पुस्तकसूची, अभिप्राय वही, वर्तमानपत्रातील भिलारसंबंधित बातम्यांची कात्रणे असलेली चिकटवही असे सर्व ठेवलेले असते. कादंबऱ्या, विनोद, ऐतिहासिक , नियतकालिके, दिवाळीअंक, बोलकी पुस्तके, अशा ३० पद्धतींनी वर्गीकरण केले आहे.  प्रकल्प सुरू झाला, त्यावेळी सुमारे १५,००० पुस्के होती, आता ही संख्या २५,००० झाली आहे. सर्व पुस्तके फक्त मराठीतलीच आहेत. पुस्तकविक्रीचे दुकान मात्र एकच आढळले.  एक प्रकल्प कार्यालयही आहे. साहित्यविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी एक नाट्यगृहही आहे.  या गावातून फिरताना गावातील भिंतींवर, घरांवर, पुस्तकांच्या संदर्भातलीच सुंदर सुंदर चित्रे, कार्टून्स दिसतात. आपल्या पु. लं.चं एक कार्टून तर सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध झालं आहे. गावात कुठल्या घरात, कुठल्या विषयाची पुस्तके आहेत, त्याच्या लोकेशनचा एक नकाशाही लावला आहे. त्यामुळे आपले शोधणे सोपे होते. 

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने हा आगळावेगळा उपक्रम राबविला गेला आहे. ४ मे २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.  याआधी तीन दिवस एक बस करून चित्रकार इथे आले होते. त्यांनी सगळं गाव छानछान चित्रांनी भरून टाकलं.

ब्रिटनमध्ये  हे-ऑन-वे या नावाचे एक गाव आहे. पुस्तकांची दुकाने, व साहित्यसंदर्भातील उत्सव- उपक्रमांसाठी ते प्रसिद्ध आहे. या गावावरून भिलार- पुस्तकांचे गाव बनविण्याची प्रेरणा मिळाली, असा उल्लेख मिळतो. ब्रिटनमधल्या गावाखेरीज लायब्ररी टुरिझम म्हणून ओळखली जाणारी फ्रान्समधली आठ गावे अशाच वर्णनाची  बुक टाऊन्स (book towns) आहेत. भिलारला अशियातील अशाप्रकारचे पहिले गाव म्हणण्यास हरकत नाही.


Monday, May 22, 2023

भारतात ज्यांच्या स्वाक्षरीने नोटा छापल्या जातात, त्यांचा पगार किती आहे माहीत आहे का?


आरबीआय गव्हर्नरबद्दल सर्व काही जाणून घ्या- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सध्या 2,000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहे.आरबीआयने तीन दिवसांपूर्वी ही घोषणा केली होती.  या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असतील. आरबीआयचे प्रमुख गव्हर्नर असतात. त्यांच्या सहीने नोटा छापल्या जातात. आज आम्ही तुम्हाला RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याबद्दल सांगणार आहोत. शशिकांत दास ही ती व्यक्ती आहे, ज्यांच्या स्वाक्षरीसह नोटा देशात छापल्या जातात. सध्याच्या सर्व नोटांवर तुम्हाला त्यांची सही दिसेल.जाणून घेऊया आरबीआय गव्हर्नरचा पगार किती आहे?  सध्याचे आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास कोण आहेत?

पहिल्यांदा आरबीआयच्या गव्हर्नरबद्दल जाणून घ्या- मूळचे ओडिशाचे असलेले शक्तिकांत दास यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५७ रोजी भुवनेश्वर येथे झाला.ते तामिळनाडू केडरचे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शशिकांत दास हे वित्त आयोगाचे सदस्यही राहिले आहेत.  गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवणारे म्हणून दास ओळखले जातात. शक्तिकांता दास यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. 2008 मध्ये त्यांना पहिल्यांदा अर्थ मंत्रालयात सहसचिव बनवण्यात आले.  त्यावेळी पी. चिदंबरम अर्थमंत्री होते. 

शशिकांत दास यांना दुसरी टर्म मिळाली आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दुसरी टर्म मिळवणारे शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आहेत. 1980 च्या बॅचचे आयएएस असलेल्या दास यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. 2021 मध्ये त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला.

 2018 मध्ये त्यांनी उर्जित पटेल यांची जागा घेतली होती.  उर्जित पटेल यांची सप्टेंबर 2016 मध्ये आरबीआय चे 24 वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आरबीआय गव्हर्नर पदाचा अचानक राजीनामा दिला.

शक्तिकांता दास यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शक्तीकांता दास यांनी इतर विविध पदे जसे की आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयात सहसचिव अर्थसंकल्प, तमिळनाडू सरकारच्या महसूल विभागातील आयुक्त आणि विशेष आयुक्त, सचिव, उद्योग विभाग, तामिळनाडू इत्यादी पदांवर काम केले आहे.

आरबीआय गव्हर्नरचा पगार किती आहे?

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा पगार दरमहा अडीच लाख रुपये आहे. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावर्षी त्याच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. आता आरबीआय गव्हर्नरचा पगार साडेतीन लाखांवर गेला आहे.  याशिवाय आरबीआय गव्हर्नरला सरकारकडून निवास, वाहन, ड्रायव्हर आणि इतर सुविधाही मिळतात. 

 डेप्युटी गव्हर्नरचा पगार किती?

आरबीआय गव्हर्नरनंतर चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.  यामध्ये महेश कुमार जैन, एमडी पात्रा, एम राजेश्वर राव आणि टी रबी शंकर यांचा समावेश आहे. चार डेप्युटी गव्हर्नरांचे वेतन दरमहा २.२५ लाख रुपये आहे.  डेप्युटी गव्हर्नरनाही सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातात.

Saturday, May 20, 2023

शास्त्रीय नृत्याकडे मुलांची पाठ

कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिशी अशा कोणत्याही भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील महान कलाकार म्हटल्यावर पं. बिरजू महाराज, केलुचरण महापात्रा, वेदांत सत्यनारायण अशा पुरुष कलाकारांची नावे लगेच डोळ्यांसमोर येतात. शास्त्रीय नृत्य म्हणजे ‘स्त्रैण’, ते फक्त स्त्रियांनीच करायचे, हा समज छेदणारी या कलाकारांची कारकीर्द. मात्र असे असले तरी आजही हा समज लोकांच्या मनातून फारसा पुसला न गेल्याची वस्तुस्थिती आहे. आजही शहरातील शास्त्रीय नृत्य शिकवणाऱ्या कोणत्याही वर्गात गेल्यास १५ ते २० मुलींमागे एक मुलगा, असे प्रमाण दिसून येते. अनेक नृत्य अकादमींमध्ये तर एकही मुलगा नसल्याचेही चित्र आहे. शहरातील नृत्यगुरूंमध्ये महिला गुरूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्यक्षेत्रात पुरूषांच्या प्रमाणात ‘गुणात्मक वाढ’ झाली असली तरी ‘संख्यात्मक वाढ’ मर्यादितच आहे. एकीकडे पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रिया आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असताना या स्त्रीप्रधान क्षेत्रात पुरुषांची संख्या वाढण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. समज विनाकारण रुजलाज्येष्ठ कथक नृत्यांगना व गुरू शमा भाटे म्हणाल्या, ‘‘दोन प्रमुख कारणे यामागे दिसतात. एक म्हणजे महाराष्ट्राला आपली अशी शास्त्रीय नृत्यशैली नाही. कथक नृत्यशैली ही उत्तरेतून आणि भरतनाट्यम नृत्यशैली दक्षिणेतून महाराष्ट्रात आली आणि रुजली. त्यामुळे जसे उत्तरेत किंवा दक्षिणेत प्रत्येक घरात एक मूल शास्त्रीय नृत्य शिकते, तसे आपल्याकडे होत नाही. त्यात दुसऱ्या कारणाची भर पडली, ती म्हणजे सामाजिक दृष्टिकोन. शास्त्रीय नृत्यशैली या ‘स्त्रैण’ आहेत, त्यात ‘पुरुषी’ काहीच नाही, असा एक समज विनाकारण रुजला. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात येणाऱ्या मुलांची संख्या कमीच राहिली. गेल्या १०-१५ वर्षांत ही परिस्थिती काहीशी बदलते आहे, मात्र अजूनही मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत नगण्यच आहे.’

’चित्र हळूहळू बदलतेय

ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी कलाकारांना खूप संघर्ष करावा लागत असे, संधीही कमी उपलब्ध होत्या. मी नृत्य शिकलो त्या काळी महाराष्ट्रात मुले नृत्य शिकत नसत. पण आता चित्र हळूहळू बदलत आहे. संधी वाढल्याचा हा परिणाम आहेच. विद्यापीठीय शिक्षणात याचा समावेश झाल्याने मदत झाली आहे.’’

शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये दडलेला आशय हा बहुतेककरून स्त्रीप्रधान असल्याने त्याची अभिव्यक्तीही स्त्रीसुलभ आहे. या कारणाने देखील मुले शास्त्रीय नृत्याकडे लवकर वळत नाहीत. पण दूरचित्रवाणीवरील नृत्य कार्यक्रमांमुळे गेल्या १५ वर्षांत ही परिस्थिती काहीशी बदलली. कारण, या कार्यक्रमांमध्ये दृश्यस्वरूप का होईना, पण शास्त्रीय नृत्यप्रकार हाताळले जातात. मात्र अजूनही मुलांच्या संख्येत वाढ होण्यासाठी खूप वाव आहे.- डॉ. परिमल फडके, भरतनाट्यम नर्तक 

सामाजिक दबावही कारणीभूत

शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या पुरुष कलाकारांना सामाजिक दबाव देखील झेलावा लागतो. सगळ्या मुलीच असलेल्या वर्गात जाऊन नृत्य शिकण्यास मुले बिचकतात. लास्यप्रधान नृत्यामुळे अनेकदा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अवमानकारक टिप्पणी केली जाते. आजही आपल्या समाजात विवाह करताना पुरुषाकडे उत्पन्नाचे ठोस साधन असावे, अशी अपेक्षा असते. कुटुंबाचा चरितार्थ चालण्याची अपेक्षा पुरुषांकडूनच केली जाते. त्यामुळे शास्त्रीय नृत्यासारख्या ठोस उपजीविकेची खात्री नसलेल्या क्षेत्रात येण्याला मुले पसंती देत नाहीत. 

बदलासाठी हे करणे गरजेचे- शास्त्रीय नृत्य करणाऱ्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा- शास्त्रीय नृत्य केवळ स्त्रीप्रधान, हा समज खोडून काढण्यासाठी प्रयत्न- त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र आदींच्या माध्यमातून प्रयत्न - शाळा, महाविद्यालयांमधून शास्त्रीय नृत्याची आवड असणाऱ्या मुलांना प्रोत्साहन - नृत्य शिकणाऱ्या मुलांसाठी उपजीविकेच्या अधिक संधींची निर्मिती

Friday, May 19, 2023

जादूगार रघुवीर: जादुई आणि अद्भुत


जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांचे या वर्षापासून  जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. पुण्याजवळच्या छोट्या गावात जन्म झालेला एक मुलगा लहानपणी आई वडिलांचं छत्र हरवल्यावर पुण्यात अनाथ विद्यार्थी गृहात येतो काय, तिथे आलेल्या राजस्थानी जादूगाराचे प्रयोग बघून प्रेरित होतो काय अन् स्वतःची टीम बनवून जगभर प्रयोग करतो काय...सगळंच जादुई आणि अद्भुत...प्रचंड मेहनत, कौशल्य, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि सभशन कला, नावीन्याची आस आणि प्रबळ आत्मविश्वास या जोरावर जादूगार रघुवीर यांनी जगभर नाव कमावलं. म्हणूनच पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रात छत्रे यांनी सर्कशीत जे नाव कमावलं तेच काम जादूगार रघुवीर यांनी जादूच्या क्षेत्रात कमावलं आहे, असं कौतुक केलं आहे. रघुवीर जादूगार यांनी त्यांच्या हयातीमध्ये सात हजार २३ प्रयोग केले. वर्ष १९६० मध्ये पुण्यामध्ये ‘जादूची शाळा’ नावाची एक संस्था त्यांनी काढली. अनेक लहान गावांत व शहरांत त्यांनी शाळा, सामाजिक संस्था यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चॅरिटी शो केले. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये राधेश्याम महाराज साकारताना त्यामध्ये अचूकता यावी म्हणून अत्र्यांनी पणशीकरांना रघुवीर जादूगार यांच्याकडे जादूचे छोटे प्रयोग शिकायला पाठवले होते. रघुवीर जादूगार यांनी लिहिलेल्या ‘मी पाहिलेला रशिया’, ‘प्रवासी जादूगार’ या पुस्तकात त्यांच्या परदेशातील आलेल्या रोचक अनुभवाचे वर्णन वाचायला मिळते. यातील ‘प्रवासी जादूगार’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

रघुवीर यांनी आपल्या मुलाला आणि नातू जितेंद्र यांना विजय रघुवीर आणि मला हेच शिकवलं की केवळ वारसा हक्काने कला येऊन उपयोग नाही ती लोकांपुढे योग्य पद्धतीने सादर केली पाहिजे. त्यांची एक हृदय आठवण जितेंद्र जादूगार सांगतात की,  माझ्या जन्माआधी माझ्या आईला खुशालीच्या लिहिलेल्या पत्रात जितेंद्र पुढे जाऊन उत्तम जादूगार बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांचा हाच विश्वास जितेंद्र जादूगार यांनी सार्थ ठरवला आहे. तिसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत आहे. जितेंद्र यांनी अनेक नवीन जादू कला शिकली आहे. जपानची तीन भुते, बॉक्स ऑफ मोगली, अव्हेंजर सिरीज मधील काही जादू, गिफ्ट बॉक्स हाऊस ऑफ मायाजाल आणि  बालपणावर आधारित स्पेशल जादू असे अनेक प्रयोग सादर केले जातात. जादू ही कला महाराष्ट्राच्या मातीतून जगभरात नेणाऱ्या या अवलियाला जादुई मानवंदना.

Sunday, May 14, 2023

ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेला सातारा


(ओळख जिल्ह्याची)

सातार्‍याची ओळख म्हणजे पेन्शनरांचे शहर. चित्रकार, कलाकार, लेखक, साहित्यिक, विचारवंत तसेच चळवळीचे नेतृत्व करणारे याच मातीत जन्माला आले.   साताऱ्याला ऐतिहासिक आणि  सामाजिक पार्श्वभूमी आहे. चळवळी आणि लढवय्यांचा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. या मातीतील अनेकांनी जशी छत्रपती शिवरायांची पाठराखण केली, तशीच ती देशाच्या रक्षणासाठी पिढ्यान्पिढ्या घालवणारी या जिल्ह्यातील काही गावेदेखील आहेत. देव, देश अन्‌ धर्मासाठी सर्वस्व बलिदान करण्याची तयारीही या जिल्ह्यातील लोकांची असते. परंपरा सांभाळणे आणि ती जपणे यालाही प्राधान्य दिले जाते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई या फलटणच्या माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या होत्या. फलटणचे निंबाळकर घराणे तेव्हापासून आपला वारसा जपत आले आहे, तर शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे तळबीडचे होते. ते सैन्यात जुमला म्हणजे शे-दीडशे सैन्यांचे अधिकारी होते, तसेच ते ताराराणी यांचे वडील होते. असा ऐतिहासिक वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, वृषालीराजे भोसले यांच्या माध्यमातून पुढे सरकत आहे. साताऱ्याचा राजवाडा, अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगड हे कायम शिवरायांच्या पराक्रमाची आणि अस्तित्वाची साक्ष देत असतात.  

सातार्‍याला असाच क्रांतीचादेखील इतिहास आहे. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावून लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांनी साताऱ्यातून प्रतिसरकार (पत्रीसरकार) चालविले, त्यांचाही वारसा साताऱ्याला आहे. त्यांचा जन्म आताच्या सांगली जिल्ह्यातील असला तरी त्यांचे बहुतेक काम हे सातारा जिल्ह्यातच होते. शासनाची समांतर व्यवस्था असलेले प्रतिसरकार त्यांनी चालविले होते.  जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारकांनी त्यावेळी या लढ्यात उडी घेतली होती. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, किसन वीर अशा कितीतरी नावांचा अभिमान साताऱ्याला आहे.

कामगारांसाठी लढणारे आणि त्यांचे खटले मोफत चालविणारे अँड. व्ही.एन. पाटील, डी.व्ही. पाटील यांच्यासारखे कामगारांचे नेतेही साताऱ्याच्या मातीत जन्माला आले. बा.सी. मर्ढेकर, गो.पु. देशपांडे, व.बा. बोधे, आ.ह. साळुंखे यांच्या साहित्यकृतींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न सातारकरांमधून होतो. खाद्यसंस्कृतीमध्येही सातारकरांचा गोडवा जरा वरचाच आहे. येथील कंदी पेढ्याची तुलना जगातील कोणत्याच पेढ्याशी होत नाही.  या पेढ्याबरोबरच लावण्यांमधूनही साताऱ्याच्या चुन्याची खासियत सांगितली जाते. याठिकाणच्या चुना गल्ल्याही प्रसिद्ध आहेत. 

साताऱ्याच्या सभोवती असलेल्या सात किल्ल्यांचाही सातारकरांना अभिमान आहे. अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगड, मकरंदगड, महिमंडणगड, वासोटा या किल्ल्यांवरील सैर एक वेगळी अनुभूती आणि इतिहासाची पदोपदी आठवण करून देणारी असते. कासचे जगप्रसिद्ध पठार आणि महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी सर्वांना मोहात पाडतेच. 

 सातारा जिल्ह्याला महापुरुषांच्या पदस्पर्श झाला आहे. या मातीतून अनेक नररत्न मोठी झाली आहेत. त्यांच्या खानाखुना आजही जिवत आहेत.  रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मृतिस्थळ, ज्या महामानव लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टर झाले. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी राज्यघटना लिहिली असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा श्रीगणेश सातार्‍यातील प्रतापसिंह महाराज विद्यालयातून केला. ती शाळा आजही ज्ञानदान करत आहे. गोरगरिबांच्या मुलांनी शिकावे म्हणून त्यांना उचलून शाहू बोडिगमध्ये ठेवले, ती धननी बाग, तेथील वडाचे झाड आजही उभे आहे. एवढेच नाही तर मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणार्‍या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, क्रातिवीर ज्योतिबा फुले याच खटाव तालुक्यातील कटगुणचे, समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरिती संपविण्यासाठी आयुष्य वेचेलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष  डॉ. नरेंद्र दाभोलकर याच मातीत घडले आहेत. या सर्वांचे कार्य संपूर्ण राज्याला दिशा देणारे ठरले आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Saturday, May 13, 2023

शिवाजी विद्यापीठ संलग्नित 286 महाविद्यालये

माहीत आहे का तुम्हाला?

दक्षिण महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात गेल्या चार वर्षात २० नव्या महाविद्यालयांची (कॉलेज) भर पडली आहे. त्यामुळे विद्यापीठ संलग्नित कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण कॉलेजची संख्या २८६ इतकी झाली आहे. त्यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक विद्याशाखांच्या कॉलेजची संख्या १९५ आहे. विविध अभ्यासक्रमांच्या कॉलेजची संख्या वाढल्याने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्याना त्यांच्या परिसरात शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. एकूण अनुदानित माहाविद्यालये 138 आहेत. त्यातील पारंपरिक महाविद्यालयांची संख्या 123 तर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या 15 इतकी आहे. विना अनुदानित महाविद्यालयांची संख्या 148 आहे. यात पारंपारिक 71 तर व्यावसायिक 77 महाविद्यालये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 129, सांगली जिल्ह्यात 85 तर सातारा जिल्ह्यात 72 माहाविद्यालये आहेत.

बृहत आराखड्यात १९ महाविद्यालयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या विद्यापीठाच्या सन २०२४ २५ ते २०२८ -२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्याचे काम सुरू आहे. त्यात नवीन महाविद्यालयांसाठी नियोजन समितीकडे ऑफलाईन स्वरूपात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून एकूण १९९ प्रस्ताव, तर ऑनलाईन गुगल फार्म प्राप्त संख्या ५१५० इतकी आहे. त्यातून एकूण १९ महाविद्यालयांची तरतूद करून मान्यतेचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला जाणार आहे.

चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलने आणले बार्ड; भारतातही लॉन्च


कृत्रिम बुद्धिमतेविषयी उत्सुकता असलेल्या लोकांस ही बातमी नक्कीच आनंदाची आहे.अनुभवी टेक कंपनी गुगलने भारतात आपले एआय टूल बार्ड लॉन्च केले आहे. हे ओपनएएल  (OpenAI) च्या चॅटजीपीटीच्या स्पर्धेत आणले गेले आहे. गुगलची संभाषण जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट सेवा भारतासह 180 हून अधिक देशांमध्ये आणली जात आहे, याची घोषणा गेल्याच आठवड्यात कंपनीच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात वार्षिक विकासक परिषदेत करण्यात आली आहे.बार्ड लाँच करताना, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले, "जसे एआय मॉडेल अधिक चांगले होत आहेत, आम्ही ते थेट लोकांना उपलब्ध करून देत आहोत." गुगलच्या मते, बार्ड मोठ्या भाषेच्या मॉडेल्सची शक्ती, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांच्या संयोगाने सुसज्ज आहे.हे अशा प्रकारे विकसित केले गेले आहे की ते वापरकर्त्याच्या प्रतिक्रिया आणि इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित ज्ञान प्राप्त करेल. 

बार्ड ही गुगलची कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट सेवा आहे, जी लाम्डा तंत्रज्ञान वापरून तयार केली गेली आहे.सुंदर पिचाई यांनी यापूर्वी प्रायोगिक संभाषणात्मक एआय सेवा  (एक्सपेरिमेंटल कन्वर्सेशनल एआइ सर्विस) असे वर्णन केले होते. आता ते सार्वजनिक वापरासाठी सुरू करण्यात आले आहे.  बार्ड लाम्डा आणि गुगलच्या स्वतःच्या संभाषणात्मक एआय चॅटबॉटवर आधारित आहे. 

चॅटजीपीटीपेक्षा किती वेगळे आहे बार्ड

 ChatGPT आणि Google's Bard मध्ये बरेच साम्य तसेच फरक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता साधन ChatGPT पूर्व-अस्तित्वात असलेल्या डेटावर आधारित प्रश्नांची उत्तरे देते, तर Google चा AI चॅटबॉट भाषा मॉडेल आणि संवाद अनुप्रयोग (LAMDA) द्वारे समर्थित आहे. याचा अर्थ बार्ड अधिक अचूक उत्तर देऊ शकतो.

दिव्यांग मुलीला खाऊ घालण्यासाठी मजूर वडिलांनी बनवला रोबोट


पत्नी आजारी असल्यामुळे आपल्या दिव्यांग मुलीला खाऊपिऊ घालण्यासाठी तिला अडचणी यायच्या ही गरज लक्षात घेऊन एका रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुणाने चक्क एक रोबोट विकसित केलेला असून त्याचे परिसरात कौतुक केले जात आहे. गोव्यातील पणजी येथे हे कुटुंबीय राहते गोव्यातील स्टेट इनोव्हेशन कौन्सिल यांनी देखील या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बिपिन कदम ( वय 40 ) असे या मजुराचे नाव असून ते आपली पत्नी आणि दिव्यांग मुलगी यांच्यासोबत राहतात. रोजंदारीवर काम करणारे दीपक हे पौंडा तालुक्यातील बेथोरा गावचे रहिवासी आहेत. 14 वर्षाची बिपिन यांची मुलगी दिव्यांग असून ती स्वतःच्या हाताने जेवण करू शकत नाही म्हणून आत्तापर्यंत तिला तिची आई रोज जेवण भरवत होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून आईची देखील तब्येत व्यवस्थित राहत नाही.

पत्नी आजारी आणि आपण इतरत्र कामाला गेल्यामुळे मुलीला खाऊ कुणी घालायचे हा मोठा प्रश्न कुटुंबीय समोर होता त्यानंतर बीपीन यांनी पर्याय शोधायचा म्हणून रोबोट तयार करण्याची योजना आखली आणि कामावरून सुटल्यानंतर रोज बारा-बारा तास काम केल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या मुलीसाठी रोबोट बनवलेला आहे. रोबोटच्या शरीरावरील एका प्लेटमध्ये जेवण ठेवले जाते आणि दिव्यांग मुलीने व्हॉईस कमांड दिल्यानंतर हा रोबोट तिला खाऊ घालतो. तोंडी आदेशानुसार खाऊ घालणारा रोबोट हा चांगलाच चर्चेत आलेला असून बिपिन कदम यांचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे .

महाराष्ट्रात जन्मलेल्या बिपिनला आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही.  गोव्यात हेल्पर म्हणून कामाला सुरुवात केली आणि सध्या थ्रीडी डिझायनर म्हणून काम करत आहे. हे ज्ञान त्यांनी रोबोट तयार करताना वापरले. ते तयार करण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी आणि 12 हजार रुपये लागले. हा रोबोट  आवाजावर काम करतो.  यामध्ये त्याने तीन-चार वाट्या आणि एक चमचा टाकला आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या नावाने त्याने या रोबोटच्या मेमरीमध्ये बसवली आहे.  अशाप्रकारे रोबोला भात खायला सांगितल्यावर तो भात घेऊन खाऊ घालतो.

Wednesday, May 10, 2023

(अचीवमेंट) नंदा देवी : वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत केली पाच शिखरे सर


नंदा देवी अवघ्या पाच वर्षांची असून तिने इतक्या कमी वयात पाच पर्वत शिखरांवर पोहचून विक्रम केला आहे. नैनिताल येथील रहिवासी असलेली नंदा देवी ही गिर्यारोहक तुसी आणि अनिल साह यांची कन्या आहे. तुसी साह एक माउंट एव्हरेस्ट विजेता आणि भारतीय पर्वतारोहण महासंघ (IMF) च्या सदस्य आहेत. तुसीच्या मते, नंदा देवीने अलीकडेच १३,००० फूट उंच असलेले चंद्रशिला शिखर पार केले आहे. नंदा देवीचा जन्म 6 नोव्हेंबर 2017 रोजी झाला आणि ती ऑल सेंट्स कॉलेज, नैनिताल येथे इयत्ता 1 मध्ये शिकत आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी पाच पर्वत चढणारी आणि १३,००० फूट उंची गाठणारी ती पहिली बाल गिर्यारोहक आहे.

उत्तरांचल राज्यातील मुख्य देवी म्हणून पूजल्या जाणार्‍या नंदा देवीच्या नावावरून तिचे नाव ठेवण्यात आले आहे. नंदा देवी पर्वत हे भारतातील दुसरे सर्वोच्च आणि जगातील 23 वे सर्वोच्च शिखर आहे. कांचनजंगा हे याहून उंच आणि देशातील सर्वोच्च शिखर आहे. नंदा देवी शिखर हे भारताच्या उत्तरांचल राज्यात पूर्वेला गौरीगंगा खोऱ्यातील आणि पश्चिमेला ऋषीगंगा खोऱ्यांमधील हिमालय पर्वत रांगेत आहे. नंदा देवी हिने वयाच्या अवघ्या दीड वर्षापासून 2019 मध्ये 10500 फुटांवर असलेल्या डोरिटाल येथून गिर्यारोहण सुरू केले. यानंतर तिने 2021 मध्ये यमुनोत्री गाठली आणि 12500 फुटांवर असलेले केदारकंठ ट्रेक केले. 2022 मध्ये 12500 फुटांवर असलेले त्रिंड आणि इंद्रधारा कॅम्प (धर्मशाला) पर्यंत पोहोचली. 2023 मध्ये 12000 फुटांवर असलेले तुंगनाथ आणि 13000 फुटांवर असलेले चंद्रशिला शिखर जिंकले. तूसी यांच्या म्हणण्यानुसार, नंदा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत गंगोत्रीला गेली होती. तेव्हा ती आठ महिन्यांची होती. यानंतर 2019 मध्ये लेह आणि लडाख देखील पाहिले. नंदा म्हणते की तिला तिच्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करून गिर्यारोहणात जगात अव्वल स्थान गाठायचे आहे. ती सध्या आई आणि वडिलांकडून गिर्यारोहणातील बारकावे शिकत आहे. जगातील अनेक मोठमोठी पर्वत शिखरे जिंकण्याचा तिचा मानस आहे. तुसी यांनी सांगितले की नंदा आठ महिन्यांची असताना पहिल्यांदा गंगोत्रीला भेट दिली होती. यानंतर 2019 मध्ये लेह आणि लडाख देखील पाहिले.  नंदा हिला गिर्यारोहणाचा वारसा तिच्या आईवडिलांकडून लाभला आहे.  म्हणूनच रोप क्रॉस, वर्मा ब्रिज, शिडी स्विंग इत्यादी साहसी उपक्रम ती सहज करू शकते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Sunday, May 7, 2023

बँकिंग परीक्षेची तयारी करताना या चुकांवरदेखील लक्ष ठेवा


देशातील तरुण मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्रात सामील होत आहेत.  बँकिंग क्षेत्र त्यांना करिअरच्या संधींसह चांगले पॅकेज देत आहे. या क्षेत्रात करिअर करणारे उमेदवार तयारीला सुरुवात करतात, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये ती अव्यवस्थित असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तयारी करताना छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. तयारी दरम्यान वारंवार होणाऱ्या छोट्या चुका उमेदवारांच्या यशावर परिणाम करतात. हे देखील समजून घेणे आवश्यक आहे कारण बँकिंग क्षेत्रातील काही पदांसाठी लाखो अर्ज येतात. त्यामुळे उमेदवार सहसा कोणत्या चुका करतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

नोटिफिकेशनची वाट पाहात आहात का? - जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय करत असाल आणि तुमची तयारी सुरू करण्यासाठी अधिसूचनेची वाट पाहत असाल, तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बँकिंग क्षेत्रातील परीक्षांशी संबंधित अधिसूचना वेळोवेळी येत असतात. अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, अधिसूचना उशिरा जारी होतात. अशा उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अधिसूचना आल्यानंतरच तुम्ही अभ्यास सुरू करणार असाल आणि अशीच वाट पाहत बसणार असाल, तर तुम्ही ही फार मोठी चूक करत आहात.  असे केल्याने तयारीला अनेक प्रकारे अडथळे येतात.उदाहरणार्थ, उमेदवार वेळेवर तयारी पूर्ण करू शकत नाहीत.  परीक्षेची तारीख जवळ आली असताना तयारीसाठी कमी वेळ मिळतो. अशा परिस्थितीत उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि तणाव निर्माण होतो.  एवढ्या कमी कालावधीत लक्ष्य गाठणे अवघड आहे, याची त्यांना स्पष्ट जाणीव असते. परिणामी त्यांनी कोणतीही तयारी केली तरी त्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो.  त्यामुळे तयारीसाठी नोटिफिकेशनची वाट पाहू नका.  तुम्हाला तयारीशी संबंधित काही प्रश्न असल्यास तुमच्या गुरू, शिक्षक किंवा तज्ञांशी बोला. तुम्ही ठरवला असाल की आपल्याला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर लगेच कामाला लागा. 

परीक्षेचा पॅटर्न समजत नसेल तर- अनेक उमेदवार काही पुस्तके घेऊन बँकिंग परीक्षेची तयारी सुरू करतात.  बर्याच काळापासून ते त्याच पुस्तकांचे अनुसरण करतात आणि त्यामुळे त्यांना परीक्षेचा पॅटर्न नीट समजत नाहीत. ही देखील एक मोठी चूक आहे कारण पेपरचे काही विभाग असे आहेत की ते सोपे वाटतात परंतु ते इतके सोपे नाहीत.याशिवाय वेगवेगळ्या बँकिंग परीक्षांची मार्किंग योजनाही वेगळी असते.  प्रथम अशा सर्व लहान गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 

पूर्ण तयारीबरोबरच ते योग्य दिशेने किती पुढे जात आहे हेही समजून घेणे आवश्यक आहे. मॉक टेस्ट घेऊन उमेदवार त्यांच्या क्षमतेचे मूल्यांकन करू शकतात. ते पेपरमध्ये दिलेल्या वेळेत पूर्ण करू शकतील की नाही हे देखील समजू शकतात. तुम्ही अभ्यासक्रमाच्या कोणत्या विभागात अडकला आहात, हेही मॉक टेस्ट दिल्यानंतर समजते.  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेकवेळा उमेदवार वेळेत संपूर्ण पेपर सोडवू शकू असा अतिआत्मविश्‍वास असतो, परंतु मॉक टेस्टमुळे त्यांना वास्तवाला सामोरे जावे लागते. वेळेत उणिवांची माहिती मिळाल्यास त्या दुरुस्त करून तयारी सुधारता येते. 

निकालाची वाट पाहत आहात का?-  अनेक विद्यार्थी पूर्वपरीक्षा दिल्यानंतर निकालाची वाट पाहतात आणि निकाल लागल्यानंतरच मुख्य परीक्षेची तयारी सुरू करतात. हे असे करणे टाळा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रिलिमनंतर मुख्य परीक्षेची काठीण्य पातळी आणखी वाढते, त्यामुळे वेळ वाया घालवणे योग्य नाही. प्रिलिम्स परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करण्यास उशीर करू नका.  जर तयारीमध्ये ब्रेक असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. 

गणिताचा सराव करा- अनेक उमेदवारांना बँकिंगच्या तयारीबद्दल असा गैरसमज असतो की त्यांचे गणित कमकुवत आहे आणि ते संबंधित विभागात नंबर मिळवू शकणार नाहीत, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही.अशा विभागांमध्ये सरासरी विद्यार्थीही चांगली कामगिरी करतात.  यासाठी तज्ञ अनेक टिप्स आणि युक्त्या सांगतात ज्यामुळे तयारी करणे सोपे होते.  त्यामुळे एकदा तुमची समस्या तुमच्या गुरूला सांगा. 


Tuesday, May 2, 2023

कोणते उपकरण यांत्रिक ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते?


 नॉलेज पॉवर

1. कोणते उपकरण यांत्रिक ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते?

(a) स्पीडोमीटर (b) डायनॅमो (c) लॅक्टोमीटर

2. रिश्टर स्केलवर कोणाची तीव्रता मोजली जाते?

 (a) भूकंप (b) वारा (c) वादळ

3. कोणत्या ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणतात?

 (a) बुध (b) शनी (c) शुक्र

4. शेवटचा मौर्य सम्राट कोण होता?

 (a) बृहद्रथ (b) चंद्रगुप्त (c) अशोक द ग्रेट

5. 'महाभाष्य'चे लेखक कोण आहेत?

 (a) कालिदास (b) पाणिनी (c) पतंजली

6. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 (a) गोवा (b) आसाम (c) राजस्थान

7. घाना पक्षी राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायची असेल तर आपल्याला कोणत्या राज्यात जावं लागेल?

 (a) राजस्थान (b) आंध्र प्रदेश (c) महाराष्ट्र

8. कान्हा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे?

 (a) उत्तर प्रदेश (b) मध्य प्रदेश (c) पंजाब

9. जर तुम्ही मुंबईत असाल तर तुम्ही कोणत्या राज्यात आहात?

 (a) उत्तराखंड (b) राजस्थान (c) महाराष्ट्र

10. बिहू नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

 (a) ओडिशा (b) आसाम (c) पश्चिम बंगाल

उत्तर- 1. डायनॅमो 2. भूकंप 3. शुक्र 4. बृहद्रथ 5. पतंजली 6. राजस्थान 7. राजस्थान 8. मध्य प्रदेश 9. महाराष्ट्र 10. आसाम


Monday, May 1, 2023

आर्माडिलो: 'बुलेट प्रूफ' प्राणी


आर्माडिलो हा विचित्र प्राणी अमेरिकेत आढळतो. आर्माडिलो हा सस्तन प्राणी आहे, जो दिसायला खूपच लहान दिसतो, परंतु चातुर्याच्याबाबतीत तो मोठ्या प्राण्यांनाही मागे टाकतो. आर्माडिलो सरासरी 12 ते 15 वर्षे जगतात. या लहान सस्तन प्राण्यांची खास गोष्ट म्हणजे संकट आल्यावर तो स्वतःला सहज वाचवू शकतो. कोणत्याही मोठ्या हल्ल्यादरम्यान, तो त्याचे शरीर फुटबॉलच्या आकारात दुमडतो. या दरम्यान, त्याला ओळखणेदेखील कठीण जाते. त्याची त्वचा एवढी कडक असते की त्यावर गोळीचाही परिणाम होत नाही. म्हणूनच त्याला 'बुलेट प्रूफ' प्राणी असेही म्हणतात. बुलेट प्रूफ त्वचेमुळे स्वतःचा सहज बचाव करू शकतो. त्याची लांबी 38 ते 58 सेमी आणि उंची 15 ते 25 सेमी दरम्यान असते. त्याचे वजन 2.5 ते 6.5 किलो दरम्यान असते. आर्माडिलो सरासरी 12 ते 15 वर्षे जगतात. ते तपकिरी, पिवळे आणि गुलाबी रंगाचे असतात. त्याच्या सुमारे 20 प्रजाती आढळतात आणि त्या सर्व लॅटिन अमेरिकेत आढळतात. आर्माडिलो जमिनीखाली बिळामध्ये किंवा उबदार ठिकाणी राहतात. त्याला थंड हवामान अजिबात सहन होत नाही, अति थंडीमुळे याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तो दिवसा झोपतो आणि रात्री शिकार करतो.

हा प्राणी चांगला जलतरणपटू आहे आणि 6 मिनिटांपर्यंत आपला श्वास रोखून धरू शकतो. आर्माडिलोची नखे खूप तीक्ष्ण आणि मजबूत असतात, ज्याद्वारे तो स्वतःसाठी बिळ खोदतो. बेबी आर्माडिलो हाडाशिवाय आणि विशेष कोट (मजबूत कातडी) सह जन्माला येतो.मऊ त्वचेचे कठोर चिलखत कातडीत रूपांतर होण्यासाठी काही आठवडे लागतात.  त्यांच्या मुलांना पप्स म्हणतात. 

त्याचे डोके, पाठ, पाय आणि शेपटी एका विशेष मजबूत थराने झाकलेली असते. किडे-कीटकांव्यतिरिक्त आर्माडिलो लहान सस्तन प्राणी, पक्ष्याची पिल्लं,अंडी, वनस्पतींची मुळं आणि फळं खाण्यास प्राधान्य देतात. त्याची जीभ लांबलचक आणि चिकट असते, जी मुंग्या आणि दीमकांची शिकार करण्यास मदत करते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...