Saturday, July 22, 2023

देशातील पहिले रेल्वे स्टेशन: छत्रपती शिवाजी टर्मिनस


आज भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे 7,500 स्टेशन आहेत.  पण 16 एप्रिल 1853 रोजी जेव्हा भारतात पहिल्यांदा मुंबईतील (तेव्हा बंबई) बोरीबंदर ते ठाणे अशी ट्रेन धावली तेव्हा या 34 किलोमीटरच्या प्रवासात एकही रेल्वे स्टेशन नव्हते. ना बोरीबंदरमध्ये, जिथून ट्रेन सुटली, ना ठाण्यात, जिथे ट्रेन पोहचली. तेव्हा फक्त बोरीबंदर ते ठाणे असा रेल्वेमार्ग टाकण्यात आला होता.या रुळावरून जी ट्रेन निघाली त्यात सुमारे ४०० प्रवासी बसले होते आणि ते खेचण्यासाठी साहेब, सुलतान आणि सिंग हे तीन वाफेचे इंजिन जोडलेले होते.ही घटना 18 व्या शतकात भारतात घडलेल्या सर्वात मोठ्या घटनांपैकी एक होती.

 कलात्मक रचना असलेले स्टेशन : पहिली ट्रेन धावल्यानंतर सुमारे 15 वर्षांनी, 20 जून 1878 रोजी, भारतातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी व्हिक्टोरिया टर्मिनसच्या रूपाने झाली.ज्याला आजकाल छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणतात.हे स्थानक 10 वर्षात पूर्ण झाले, जे आज युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये समाविष्ट आहे. या इमारतीत तीन संस्कृतींचे दर्शन घडते.  ख्रिश्चन, मुघल आणि हिंदू स्थापत्यकलेचा संगम याच्या वास्तुकलेमध्ये पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन होते. तत्कालीन ब्रिटीश राणी व्हिक्टोरियाच्या नावावरून याला नाव देण्यात आले आणि तेव्हा त्याच्या बांधकामासाठी 16 लाखांहून अधिक रुपये खर्च करण्यात आले.यावरून इंग्रजांनी किती भव्यदिव्य बनवले असावे याचा अंदाज येतो. ही इमारत 2.85 हेक्टरमध्ये पसरलेली आहे आणि आज जगातील काही मोजक्या सुंदर इमारतींपैकी एक आहे.  ब्रिटीश वास्तुविशारद एफडब्ल्यूने याचे डिझाइन केले होते, परंतु हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन नाही.

तिसरे सर्वात मोठे स्टेशन: प्लॅटफॉर्मच्या आधारावर पाहिले तर, आज भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हावडा जंक्शन आहे. जेथे एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत आणि दोन रेल्वे ट्रॅक अतिरिक्त बनवलेले आहेत. देशातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्येच आहे आणि तेही कोलकात्यात. हे स्टेशन सियालदाह नावाने प्रसिद्ध आहे, जिथे 21 प्लॅटफॉर्म आणि 28 रेल्वे ट्रॅक आहेत.सियालदह रेल्वे स्थानकाची पायाभरणी 1869 मध्ये झाली. सियालदाह रेल्वे स्थानकाच्या उत्तर टर्मिनलमध्ये 13 आणि दक्षिण टर्मिनलमध्ये 7 प्लॅटफॉर्म आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनल्स म्हणजेच सीएसटी हे देशातील तिसरे सर्वात मोठे रेल्वे स्थानक असून, एकूण 18 प्लॅटफॉर्म आहेत. सीएसटी हे देशातील पहिले बांधलेले रेल्वे स्टेशन आहे, ते मध्य रेल्वेचे मुख्यालय देखील आहे आणि केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.येथून दररोज शेकडो मध्य रेल्वेच्या गाड्या सुटतात, तर मुंबईची उपनगरी सेवाही याच रेल्वे स्थानकावरून चालते. जेव्हा हे रेल्वे स्थानक बांधले गेले तेव्हा ते केवळ रेल्वे स्थानकच नव्हते तर आशियातील एक प्रकारची सर्वात मोठी इमारत होती. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...