राज्यात २०१९ - २०२२ या काळात १ लाख ३६ हजार ७३३ मुलांमध्ये तीव्र आणि अतितीव्र कुपोषण आढळून आले आहे. तर कुपोषणामुळे ६ हजार ५८२ बालकांचा मृत्यू देखील झाला आहे.आदिवासींमधील कुपोषणाची समस्या पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे. कुपोषणामुळे मृत्यू झालेल्यांपैकी तब्बल १५ हजार २५३ बालकांच्या मातांचे बालविवाह झाले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, ‘आयसीडीएस’चे उपायुक्त जी. व्ही. देवरे आणि आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. चौहान यांची समिती स्थापन केली होती.या समितीने २०१९ - २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीतील मुलांचे कुपोषण आणि त्यामागच्या कारणांचा अभ्यास केला. आशा सेविकांच्या माध्यमातून १ लाख ३३ हजार ८६३ कुपोषित मुलांच्या तसेच कुपोषणामुळे मृत्यू झालेल्यांच्या घरांमध्ये जाऊन ही पाहणी करण्यात आली आहे. या समितीने आदिवासीबहुल १६ जिल्ह्यांमध्ये ही पाहणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कुपोषणाचे आणि बालविवाहाचे प्रमाणही नंदुरबार जिल्ह्यातच अधिक आढळून आले आहे. २०१९ - २०२२ या काळात नंदुरबारमध्ये ५६ हजार ९८४ तीव्र आणि अतितीव्र कुपोषित बालके होती. त्या खालोखाल नाशिक, पालघर, ठाणे आणि गडचिरोलीमध्ये देखील बालविवाहामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक दिसते आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड
खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...
-
तंत्रज्ञानाच्या या विश्वात 20 वर्षे घालवल्यानंतर, डॉ तथागतो राय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असे उपकरण तयार केले आहे जे एका मिनिटात म...
-
रोबोट आता बरीच कामे करीत आहे. घर, ऑफिस ची साफसफाई करतो, जेवण सर्व्ह करतो. गाणी म्हणतो, रुग्णांची सेवा करतो. इतकेच नव्हे तर रोबोट रुग्णांवर श...
-
आपल्या देशात नद्यांना मातेचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली जाते.जसे की गंगा नदीला सर्वात पवित्र नदी म्हटले जाते आणि या नदीची माता म्हणून पूजा...
No comments:
Post a Comment