राज्यात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आठ शहरांमध्ये १७ हजार ४०२ कोटी खर्चून ३२० प्रकल्प सुरू केले आहेत. यापैकी २३६ प्रकल्प जवळपास पूर्ण झाले. उर्वरित ८४ वेळेत पूर्णत्वास जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत दोन वर्षांच्या अटीतटीच्या स्पर्धेनंतर जून २०१८ मध्ये १०० शहरांची यासाठी निवड करण्यात आली. यात राज्यातील आठ शहरांचा समावेश आहे. सर्वाधिक प्रकल्प ठाणे (५३), नाशिक (५०), सोलापूर (४९) आणि पुणे (४८) येथे आहेत. छत्रपती संभाजीनगरला ४६ प्रकल्पांसाठी ३,५४७ कोटी तर नाशिकला ३,१४० कोटीं निधी व त्यापाठोपाठ ठाण्याला २८७४ कोटी मिळाले. जून 2023 मध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर व ठाणे ही शहरे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केली जातील. छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड
खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...
-
तंत्रज्ञानाच्या या विश्वात 20 वर्षे घालवल्यानंतर, डॉ तथागतो राय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असे उपकरण तयार केले आहे जे एका मिनिटात म...
-
रोबोट आता बरीच कामे करीत आहे. घर, ऑफिस ची साफसफाई करतो, जेवण सर्व्ह करतो. गाणी म्हणतो, रुग्णांची सेवा करतो. इतकेच नव्हे तर रोबोट रुग्णांवर श...
-
आपल्या देशात नद्यांना मातेचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली जाते.जसे की गंगा नदीला सर्वात पवित्र नदी म्हटले जाते आणि या नदीची माता म्हणून पूजा...
No comments:
Post a Comment