महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागातील तब्बल ३१ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आता समोर आली आहे. ३३ हजार ४३४ पदांपैकी १० हजार ४४८ पदे रिक्त असून, यातील सर्वाधिक पदे ही ‘क’ संवर्गातील आहे. माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला महसूल विभागाच्या वतीने यासंबंधीचे उत्तर देण्यात आली आहे. सरळसेवा भरती रखडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे. राज्य सरकारने सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत म्हणून उमेदवार आक्रमक झाले आहे. ‘महसूल व वन विभागामध्ये वर्ग अ आणि ब बरोबरच क संवर्गातील सर्वाधिक पदे रिक्त आहे. यामध्ये तब्बल ५००० हून अधिक पदे ही तलाठ्यांची आहेत.
रिक्त पदांमुळे ग्रामिण भागातील यंत्रणांना अधिक ताण सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर नागरिकांनाही विविध सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. माहिती अधिकाराला उत्तर देताना महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट केले आहे. याद्वारे चार हजार ६८१ जागा भरण्यात येणार आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया केंव्हा पार पडेल याबद्दल स्पष्टता नाही.महसूल विभागातील महत्त्वाच्या पदांचे विवरण असे- संवर्ग - मंजूर पदसंख्या - रिक्त पदे उपजिल्हाधिकारी - ३०० - ५६, तहसिलदार - २०९ - ८५, अराजपत्रित लघुलेखक - १६६ - ९२मंडळ अधिकारी - ५७०९ - ९५४नायब तहसिलदार - ६३७ - २८१तलाठी - १५७४४ - ५०३०गटानूसार रिक्त पदांचे विवरण (पदोन्नतीसह) -गट - मंजूर पदसंख्या - रिक्त पदेअ - १५७७ - १४०ब - ३४०१ - ८८३क - ३९४७४ - ९९५६ड - ७७९१ - २३७५एकूण - ५२२४३ - १३३५४(३१ नोव्हेंबर २०२२ पर्यंतची आकडेवारी)
No comments:
Post a Comment